मी स्वत - पासून सुरूवात करतो.
राजकारण्यावर वारंवार टिका करण्याचा जन्मसिद्ध अधिकार लाभलेला मी पत्रकार. पत्रकारितेत मी काय करतोय, हे मी जाणून घ्यायला हवं. मला नुकतेच एक मंत्री महोदय भेटले. सध्याच्या पत्रकारितेवर बोलताना ते म्हणाले, ''तुम्ही मीडियावाले... आठवी-नववी शिकलेली पोरं. एक दंडुका हातात घेता आणि आम्हाला जाब विचारता. तुमच्याकडे किती नाॅलेज आहे हे अगोदर तपासता का ?'' त्यांचा हा प्रश्न बरोबर आहे. माहिती नसतानाही अर्धे हळकुंडाने पिवळे झालेले पत्रकार, ४० वर्षे राजकारणात घालवलेल्या नेत्याच्या विरोधात बातमी देताना नक्कीच आपली पण तेवढी पात्रता आहे का, हे तपासायला हवं.
पाॅलिटीकल रिपोर्टरचं नेमके काय काम असतं. अनेकजण राजकीय बातमीदारी करतात. म्हणजे नेमकं काय करतात ? राजकारण्यांच्या पुढे मागे फिरणं.. राजकीय नेत्यांसोबत फोटो काढणं... किंवा हांजी हांजी म्हणत एखाद्या विशिष्ट विचारधारेच्या दावनीला बांधून घेणं. काय असते राजकीय पत्रकारिता. आपण खूप काहीतरी वेगळ्या ग्रहावरचे आहोत, असा जर कोणात्या पत्रकाराचा समज असेल तर त्यांनी एकदा दिल्लीच्या जंतर मंतर इथं जाऊन एक फेरफटका मारून यावं. तिथे राजकीय किस्से रंगवता येत नाही की एकमेकांच्या उकाळ्या पाकाळ्याही काढता येत नाहीत... कारण गर्मीच ऐवढी असते की पाय थांबत नाही. घामानं दोन तीन वेळा आंघोळ तर ठरलेलीच असते. त्यात कर्णकर्कश आवाज. दोन पावलागणिक कानांवर पडणारा गोंगाट मस्तक तापवतो. ठरलेली बातमी कव्हर करण्याकडे जेंव्हा पावले वळतात तेंव्हा जंतर मंतरच्या त्या रस्त्यावरून जाताना प्रत्येक नेत्याचा बेंबीच्या देठापासून निघणारा आवाज एका कानातून ऐकून दुस-या कानातून सोडण्यातच आपलं भलं असल्याचं जाणवतं. पोटतिडकीन माईक वर ओरडणारी ही वेडी माणसं कुठून येतात.? असा प्रश्न तेंव्हा मनात डोकावून जातो. आमच्या पोटात भूकेनं आग लागलेली असते आणि तिथे ४६ डिग्री तापमानात प्रत्येक कोप-यात एखाद्या संघटनेचा लीडर भाषण ठोकत असतो. 'वन रॅक वन पेन्शन' साठी लढणारे जवान असो की आसाराम बापू च्या सुटकेसाठी रात्रं दिवस फोटो समोर भजन करणा-या महिला भक्त असो.. समाजाच्या वेगवेगळ्या रूपाचं दर्शन जंतर मंतरवर होतं. यातच आणखी एका आंदोलनाची भर. तामिळनाडू चे शेतकरी मागील ४३ दिवसापासून कर्जमाफी साठी कपडे काढून आंदोलनाला बसले. आत्महत्या केलेल्या शेतक-यांची हाडे आणि कवटी समोर मांडून आंदोलन सुरू आहे. विष्टा खाण्यापासून ते उंदराचे भोजन करण्यापर्यंत सगळे प्रयोग त्यांना केले. पण मोदी सरकारवर काही एक परिणाम झाला नाही.
.
ते आंदोलन कव्हर करायला निघालो. तेवढ्यात कळालं महाराष्ट्राच्या शेतक-यांचं आंदोलन जंतर मंतरवर झालंय. कॅमेरामनला म्हणालो जाऊन येऊ एकदा. बुधवारचा दिवस इतर दिवसांसारखाच असेल असं वाटलं होतं. पण घडलं वेगळंच. समोर स्टेज उभं होतं. स्टेजच्या समोर बटाटे पडले होते. मला कळालं हे शेतक-यांचे आंदोलन आहे. पण, स्टेजवर टोपी घातलेली काही मुलं दिसली. मला एकानं सांगितलं, महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या शेतक-यांची मुलं आहेत ती. आंदोलनात सहभाग होण्यासाठी आली आहेत. मी जवळ गेलो. या मुलांना शेतकरी आत्महत्या म्हणजे काय, हा विषय माहित नव्हता. तिथे दोन चेहरे दिसले. काही लहान मुलं निरागसपणे शांत बसली होती तर काही सातवीतली मुलं धीरगंभीर चेहरा करून सगळं ऐकत होती. त्यांच्याजवळ गेलो. अमिष नावाच्या जेमतेम पाच वर्षाच्या मुलाला विचारलं. भूक लागली का ? ते बाळ म्हणालं, बाबा भेटत नाहीत. मला खाऊ आणून देत नाहीत. मला खाऊ आणून देशील का ? मी त्याला जवळ घेतलं. तिथल्या स्टाफ ला म्हणालो, ती फ्रुटी द्या. फ्रुटी त्याला दिली.
मरण काय असतं या लहानग्यांना काय माहित. आत्महत्या करणं सोपं असतं का ? ऐवढ्या गोड पोराला अंथरूणात सोडून बाप गळाला फास लावतो. आयुष्य संपवतो. तिथं फक्त त्याचं आयुष्य संपत नाही तर त्याच्या लेकराचं भवितव्यही अंधारात जातं. त्या घोळक्यात बसलेल्या नववीच्या एका मुलाला विचारलं तुझे बाबा गेल्यावर तू शिक्षण कसं केलं? त्याने सांगितलं, बाबा गेल्यावर तर माझ्या आईकडे लोकांनी वेगळ्या नजरेनं बघायला सुरू केलं. गावात राहणं अवघड झालं. मग नातेवाईकांनी मदत केली आणि गावाबाहेर पडलो. त्याला विचारलं तुला काय बनायचंय, तो म्हणाला, शेतीमध्ये संशोधन करायचंय. शास्त्रज्ञ बनायचंय. शेतीतील उत्पन्न वाढवायचंय. माझ्या बाबानं जे केलं ते पुन्हा कुणाच्या वाटयाला यायला नको.
दुस-या एका मुलीला तर आयपीएस अधिकारी व्हायचंय. तिचे आई वडील शेतात काम करायचे. तेंव्हा मालक आईवडीलांना मारायचा. माझे आई बाबा नाहीत पण असं कोणाच्या घरी व्हायला नको. म्हणून पोलिस बनायचयं. तर सहा महिन्यापूर्वीच एका मुलीचे बाबा गेले. तिला विचारलं तर, टिचर बनायचं म्हणाली. का तर मुलांनी शेती नको तर नौकरी करावी. कारण शेती केली तर बाबा सारखं जीव द्यावं लागेल.
आत्महत्या केलेल्या शेतक-यांची ही लहानगी अनाथ मुलं सरकारच्या तोंडावर चपराक आहेत. गायीचं रक्षण करण्यासाठी गौरक्षक दल निर्माण करणारं हे भामटं सरकार गायीला आयुष्यभर सांभाळणा-या जिवंत शेतक-याचं रक्षण का करू शकत नाही ? का आत्महत्या थांबवता येत नाही ? त्यांना मदत का पोहोचत नाही ? केवळ पत्रकार असल्यामुळे मी हे प्रश्न विचारत नाही. तर तुम्ही कोणत्या गोष्टीला महत्त्व देता हे मला समजून घ्यायचंय. मला सांगा समजावून विदर्भ-मराठवाड्याच्या शेतक-यांना दिलेले पॅकेजचे आकडे ढगात गायब झाले का ?
या मुलांकडे पाहून माझी मला लाज वाटली.
माझी पत्रकारिता आज-उद्या संपेल. पण माणूस म्हणून मला माझी जबाबदारी नाकारता येणार नाही.
मला त्या सन्माननीय मंत्री महोदयांना सांगायचंय,
पत्रकारिता करताना काही नववी शिकलेल्या पत्रकारांची पात्रता नसेलही पण संवेदना तर जिवंत असायला पाहीजेत ना. शेतकरी गळफास लावून आत्महत्या करतोय, विहीरीत उडी घेऊन जीव देतोय, हे समजण्यासाठी कोणत्या विद्यापीठाची डिग्री घ्यावी लागते ते तरी सांगा.
निसर्गानं, राजकारण्यानं, सावकारानं आणि रूढी-परंपरांनी या मुलांच्या आई बाबांना हिरावून घेतलंय. त्यांना त्यांचं विश्व परत करायचंय.
या लहानग्यांचे आयुष्य घडवण्यात माझा हातभार लागणार नसेल तर पत्रकार म्हणून मी कितीही यश मिळवलं तरी 'माणूस' म्हणून मी नीच असेन.
रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली.
राजकारण्यावर वारंवार टिका करण्याचा जन्मसिद्ध अधिकार लाभलेला मी पत्रकार. पत्रकारितेत मी काय करतोय, हे मी जाणून घ्यायला हवं. मला नुकतेच एक मंत्री महोदय भेटले. सध्याच्या पत्रकारितेवर बोलताना ते म्हणाले, ''तुम्ही मीडियावाले... आठवी-नववी शिकलेली पोरं. एक दंडुका हातात घेता आणि आम्हाला जाब विचारता. तुमच्याकडे किती नाॅलेज आहे हे अगोदर तपासता का ?'' त्यांचा हा प्रश्न बरोबर आहे. माहिती नसतानाही अर्धे हळकुंडाने पिवळे झालेले पत्रकार, ४० वर्षे राजकारणात घालवलेल्या नेत्याच्या विरोधात बातमी देताना नक्कीच आपली पण तेवढी पात्रता आहे का, हे तपासायला हवं.
पाॅलिटीकल रिपोर्टरचं नेमके काय काम असतं. अनेकजण राजकीय बातमीदारी करतात. म्हणजे नेमकं काय करतात ? राजकारण्यांच्या पुढे मागे फिरणं.. राजकीय नेत्यांसोबत फोटो काढणं... किंवा हांजी हांजी म्हणत एखाद्या विशिष्ट विचारधारेच्या दावनीला बांधून घेणं. काय असते राजकीय पत्रकारिता. आपण खूप काहीतरी वेगळ्या ग्रहावरचे आहोत, असा जर कोणात्या पत्रकाराचा समज असेल तर त्यांनी एकदा दिल्लीच्या जंतर मंतर इथं जाऊन एक फेरफटका मारून यावं. तिथे राजकीय किस्से रंगवता येत नाही की एकमेकांच्या उकाळ्या पाकाळ्याही काढता येत नाहीत... कारण गर्मीच ऐवढी असते की पाय थांबत नाही. घामानं दोन तीन वेळा आंघोळ तर ठरलेलीच असते. त्यात कर्णकर्कश आवाज. दोन पावलागणिक कानांवर पडणारा गोंगाट मस्तक तापवतो. ठरलेली बातमी कव्हर करण्याकडे जेंव्हा पावले वळतात तेंव्हा जंतर मंतरच्या त्या रस्त्यावरून जाताना प्रत्येक नेत्याचा बेंबीच्या देठापासून निघणारा आवाज एका कानातून ऐकून दुस-या कानातून सोडण्यातच आपलं भलं असल्याचं जाणवतं. पोटतिडकीन माईक वर ओरडणारी ही वेडी माणसं कुठून येतात.? असा प्रश्न तेंव्हा मनात डोकावून जातो. आमच्या पोटात भूकेनं आग लागलेली असते आणि तिथे ४६ डिग्री तापमानात प्रत्येक कोप-यात एखाद्या संघटनेचा लीडर भाषण ठोकत असतो. 'वन रॅक वन पेन्शन' साठी लढणारे जवान असो की आसाराम बापू च्या सुटकेसाठी रात्रं दिवस फोटो समोर भजन करणा-या महिला भक्त असो.. समाजाच्या वेगवेगळ्या रूपाचं दर्शन जंतर मंतरवर होतं. यातच आणखी एका आंदोलनाची भर. तामिळनाडू चे शेतकरी मागील ४३ दिवसापासून कर्जमाफी साठी कपडे काढून आंदोलनाला बसले. आत्महत्या केलेल्या शेतक-यांची हाडे आणि कवटी समोर मांडून आंदोलन सुरू आहे. विष्टा खाण्यापासून ते उंदराचे भोजन करण्यापर्यंत सगळे प्रयोग त्यांना केले. पण मोदी सरकारवर काही एक परिणाम झाला नाही.
.
ते आंदोलन कव्हर करायला निघालो. तेवढ्यात कळालं महाराष्ट्राच्या शेतक-यांचं आंदोलन जंतर मंतरवर झालंय. कॅमेरामनला म्हणालो जाऊन येऊ एकदा. बुधवारचा दिवस इतर दिवसांसारखाच असेल असं वाटलं होतं. पण घडलं वेगळंच. समोर स्टेज उभं होतं. स्टेजच्या समोर बटाटे पडले होते. मला कळालं हे शेतक-यांचे आंदोलन आहे. पण, स्टेजवर टोपी घातलेली काही मुलं दिसली. मला एकानं सांगितलं, महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या शेतक-यांची मुलं आहेत ती. आंदोलनात सहभाग होण्यासाठी आली आहेत. मी जवळ गेलो. या मुलांना शेतकरी आत्महत्या म्हणजे काय, हा विषय माहित नव्हता. तिथे दोन चेहरे दिसले. काही लहान मुलं निरागसपणे शांत बसली होती तर काही सातवीतली मुलं धीरगंभीर चेहरा करून सगळं ऐकत होती. त्यांच्याजवळ गेलो. अमिष नावाच्या जेमतेम पाच वर्षाच्या मुलाला विचारलं. भूक लागली का ? ते बाळ म्हणालं, बाबा भेटत नाहीत. मला खाऊ आणून देत नाहीत. मला खाऊ आणून देशील का ? मी त्याला जवळ घेतलं. तिथल्या स्टाफ ला म्हणालो, ती फ्रुटी द्या. फ्रुटी त्याला दिली.
मरण काय असतं या लहानग्यांना काय माहित. आत्महत्या करणं सोपं असतं का ? ऐवढ्या गोड पोराला अंथरूणात सोडून बाप गळाला फास लावतो. आयुष्य संपवतो. तिथं फक्त त्याचं आयुष्य संपत नाही तर त्याच्या लेकराचं भवितव्यही अंधारात जातं. त्या घोळक्यात बसलेल्या नववीच्या एका मुलाला विचारलं तुझे बाबा गेल्यावर तू शिक्षण कसं केलं? त्याने सांगितलं, बाबा गेल्यावर तर माझ्या आईकडे लोकांनी वेगळ्या नजरेनं बघायला सुरू केलं. गावात राहणं अवघड झालं. मग नातेवाईकांनी मदत केली आणि गावाबाहेर पडलो. त्याला विचारलं तुला काय बनायचंय, तो म्हणाला, शेतीमध्ये संशोधन करायचंय. शास्त्रज्ञ बनायचंय. शेतीतील उत्पन्न वाढवायचंय. माझ्या बाबानं जे केलं ते पुन्हा कुणाच्या वाटयाला यायला नको.
दुस-या एका मुलीला तर आयपीएस अधिकारी व्हायचंय. तिचे आई वडील शेतात काम करायचे. तेंव्हा मालक आईवडीलांना मारायचा. माझे आई बाबा नाहीत पण असं कोणाच्या घरी व्हायला नको. म्हणून पोलिस बनायचयं. तर सहा महिन्यापूर्वीच एका मुलीचे बाबा गेले. तिला विचारलं तर, टिचर बनायचं म्हणाली. का तर मुलांनी शेती नको तर नौकरी करावी. कारण शेती केली तर बाबा सारखं जीव द्यावं लागेल.
आत्महत्या केलेल्या शेतक-यांची ही लहानगी अनाथ मुलं सरकारच्या तोंडावर चपराक आहेत. गायीचं रक्षण करण्यासाठी गौरक्षक दल निर्माण करणारं हे भामटं सरकार गायीला आयुष्यभर सांभाळणा-या जिवंत शेतक-याचं रक्षण का करू शकत नाही ? का आत्महत्या थांबवता येत नाही ? त्यांना मदत का पोहोचत नाही ? केवळ पत्रकार असल्यामुळे मी हे प्रश्न विचारत नाही. तर तुम्ही कोणत्या गोष्टीला महत्त्व देता हे मला समजून घ्यायचंय. मला सांगा समजावून विदर्भ-मराठवाड्याच्या शेतक-यांना दिलेले पॅकेजचे आकडे ढगात गायब झाले का ?
या मुलांकडे पाहून माझी मला लाज वाटली.
माझी पत्रकारिता आज-उद्या संपेल. पण माणूस म्हणून मला माझी जबाबदारी नाकारता येणार नाही.
मला त्या सन्माननीय मंत्री महोदयांना सांगायचंय,
पत्रकारिता करताना काही नववी शिकलेल्या पत्रकारांची पात्रता नसेलही पण संवेदना तर जिवंत असायला पाहीजेत ना. शेतकरी गळफास लावून आत्महत्या करतोय, विहीरीत उडी घेऊन जीव देतोय, हे समजण्यासाठी कोणत्या विद्यापीठाची डिग्री घ्यावी लागते ते तरी सांगा.
निसर्गानं, राजकारण्यानं, सावकारानं आणि रूढी-परंपरांनी या मुलांच्या आई बाबांना हिरावून घेतलंय. त्यांना त्यांचं विश्व परत करायचंय.
या लहानग्यांचे आयुष्य घडवण्यात माझा हातभार लागणार नसेल तर पत्रकार म्हणून मी कितीही यश मिळवलं तरी 'माणूस' म्हणून मी नीच असेन.
रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली.
Comments