Skip to main content

पासपोर्टसाठी जन्म दाखल्याची सक्ती नाही

वृत्तसंस्था -
 यापुढे पासपोर्टसाठी जन्म दाखला आवश्यक नसल्याचे सरकारतर्फे संसदेत माहिती देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अनेक नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

पासपोर्ट नियम १९८० नुसार २६ जानेवारी १९८९ नंतर ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना पासपोर्टसाठी जन्माचा दाखला देणे अनिवार्य होते. परंतू यापुढे त्यांना हा नियम लागू होणार नाही. ते जन्मतारखेसाठी शाळेचा दाखला, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, एलआयसी पॉलिसी बॉण्ड या कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करु शकतात. तर सरकारी कर्मचारी हे सर्व्हिस रेकॉर्ड, पेन्शन रेकॉर्ड हे देखील सादर करु शकतात, असे संसदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सिंह यांनी याबाबत माहिती दिली.
देशातील लाखो लोकांना सोप्या पद्धतीने पासपोर्ट उपलब्ध व्हावा, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सिंह यांनी सांगितले. तसेच ६० वर्षापेक्षा कमी आणि आठ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना पासपोर्टसाठीच्या अर्जदारांना पासपोर्टसाठी आकारल्या जाणा-या फी वर १० टक्के सूट मिळणार आहे. पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करणारे अर्जदार आई-वडिलांपैकी एकाचे नाव अर्जात लिहू शकतात.
याआधी पासपोर्ट तयार करण्यासाठी एकुण १५ कागदपत्रांची पुर्तता करावी लागत होती. आता १५ अधिकृत कागदपत्रांऐवजी नऊ अधिकृत कागदपत्र स्वीकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही नऊ कागदपत्रे एका कागदावर प्रिंट करून तसेच सेल्फ अटेस्टेड करून सादर करायची आहेत.
यापुढे कागदपत्रावर कार्यकारी दंडाधिकारी, प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकारी यांच्या स्वाक्षरीची गरज लागणार नाही. तसेच लग्न झालेल्या व्यक्तीला पासपोर्टसाठी अर्ज करताना मॅरेज सर्टिफिकेट सादर करायची आवश्यकता नाही. घटस्फोटीत व्यक्तीला पती किंवा पत्नीचे नाव लिहायची गरज नाही.

Comments

Popular posts from this blog

......पञकारीता सुरक्षित राहलेली नाही - जेष्ठ पञकार जोशी

देशात , महाराष्ट्रात पत्रकार क्षेत्र सुरक्षित राहिलेले नाही.पत्रकारांची नोकरीच धोक्यात आली आहे. एका झटक्यात त्यांना नोकरीवरून् काढले जात आहे.इतकी भयावह स्थिती या क्षेत्राची झाली आहे. देशातील  पत्रकारांचे व कर्मचारी वर्गांचे  वेतन निश्चित करण्यासाठी मजिठीया आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती.या  आयोगाचा  आपला सादर केला.पण याप्रमाणे वेतन देण्यास वृत्तपत्र मालकांनी संघटीतपणे  नकार दिला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने  या आयोगाने केलेल्या शिफारशी प्रमाणे वेतन देण्याचा निकाल दिला. तरी वृत्तपत्र मालक हे मान्य करावयास तयार नाहीत. इतकेच त्यांनी नव्हे कंत्राटी पत्रकार व संपादक  नियुक्त करण्याचा सपाटा लावला. पण याही पत्रकारांना मजिठीया आयोगा प्रमाणे वेतन देण्याचे निर्देश न्यायालयाने  दिले.  त्यामुळे तर  वृत्तपत्र मालक अधिक बिथरले आहेत .त्यांनी तर आता कामचुकार असल्याचा ठपका  तसेच नोटबंदीचा फटका  बहाणा करत पत्रकार कर्मचाऱ्यावर कुऱ्हाड  चालवत आहेत. अनेक जणांचा बदलीच्या  माध्यमातून छळ केला जात आहे.जेणे करून त्या पत...

कशी असावी पञकारीता ........

समाजातील राजकीय,प्रशासकीय  क्षेत्रातील लोकांनो श्रमजीवी,ग्रामीण पत्रकारिता काय असते हे तुम्हाला ज्ञात आहे का? कोण असतो पत्रकार? कशी असते पत्रकारिता? थोडे कान इकडे करा ऐका,       घरची भाकरी खाऊन जगाचा आरसा असतो पत्रकार??       घरदारावर तुळशीपत्र ठेवून,घरचे पैसे खर्चून,गावातील,परिसरातील प्रश्न त्याला तडीस नेण्यासाठी धडपडतो तो पत्रकार?    अहो तुम्हाला वाटेल पगार असेल अहो कसला पगार आम्हाला साधे मानधन ही नसते,असले तर अगदी थोडके,बातमीच्या शोध,लेखन,वेळ,व बातमी पाठविणे,ती छापून येईपर्यंत वाट बघणे,अन दुसर्या बातमीच्या शोधला लागणे ही पत्रकारिता असते, हे समजून घ्या,     कुठलाही आर्थिक आधार नसतांना बातमीला आपला श्वास समजतो पत्रकार,      बातमी आल्यावर तिचे परिणाम भोगतो पत्रकार?      लोकांच्या दूषणे,पुढारयांच्या नको त्या प्रश्नाला भिडतो पत्रकार, हे सर्व समाजासाठी भोगतो पत्रकार. हो हे लिहितो ना मी आहे तसाच, जो बातमीसाठी आयुष्य भर राबतोय,     समाजाला किती कळतो पत्रकार?????    अरे विच...

पञकारीता धंदा झाला??

आजच्या भारतीय लोकशाहीत विधी पालीका , न्यायपालीका व कार्यपालीका या तिन्ही स्तंभा शिवाय चौथा स्तंभ म्हणून पञकारीतेचा उल्लेख केला जातो . पञकारीतेला एवढे महत्वाचे स्थान देण्यात आले आहेकी समाजात घडत असलेल्या घडामोडीचे वास्तव्य समाजातील लोकांन समोर आणून त्यातील उणीव , उजागार करण्याचे महत्वपूर्ण कार्य महाराष्ट्रातील पञकारांनी करावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते .  याच लोकशाहीच्या माध्यमातून इंग्रजीकाळात   लोकमान्य टिळक , बाळ जांभेकर , पुथ्वीगीर गोसावि यांनी साप्ताहिक वृत्तपञाच्या माध्यमातून समाजाला आरसा बणविण्याचे महत्वपुर्ण काम केले .  मागील भुतकाळात वृत्तपञ चालकांनी वृत्तपञाच्या माध्यमातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले मात्र आजच्या धनदांडग्या युगात काही वृत्तपञ चालकांनी याच माध्यमातून त्या स्वातंत्र्यला सुराज्य करण्यासाठी याच साप्ताहिक , दैनिक व इलेक्ट्रानिक माध्यमाचा वापर केला नाही तर स्वातंत्र्याच्या स्वार्थासाठी राजकीय दलदल करून टाकला आहे.  आज पञकारीता परमोधर्म न राहता परमोधंदा बनला आहे. आज ग्रामीण पञकारांना थोड्या मानधनात वर्षागणपती वापरून त्यांना वेठबिगाराची व...