Skip to main content

...... आईन पत्रकार जन्माला घालुन चुक केली ?

सदरक्षनाय आणि खलनिग्रहनाय असे ब्रीद घेऊन खाकीचा सृजनशील समाज रक्षणाचा आणि त्यातील गुंडप्रवृतिच्या  निर्वाहाचा वसा पोलिसांनी घेतला आहे . प्रत्येकाचे हक्क आणि कर्तव्य यात ताळमेळ राखून पगार घेऊन काम पोलीस करतात . मात्र हे करताना संविधानाने निर्धारित केलेल्या कायदा अन नियमाचे बंधन सर्वांना समान ठेवले आहे .
 अलीकडे पोलीस प्रशासकीय सेवेतील काही लोक कायदा हातात घेताना थेट खाकीच्या प्रतिमेला डागाळत असल्याचे निरक्षण अलीकडच्या काळात पाहायला मिळत आहे . दिनांक २८ रोजीची घटना त्याची साक्ष देते .
बिड जिल्ह्यातील  माजलगाव मध्ये लाठीमार आपल्या कमेरयात कैद करणाऱ्या पत्रकारास आईवर शिवीगाळ करणारी खाकी पाहून तर आज पत्रकाराच्या आईची कीवच आली . म्हणजे पत्रकार जन्माला घालून त्या माउलीने जणू पाप केले नाहीतर पत्रकाराच्या आईला कशाला शिवी दिली असती . पत्रकाराची गचांडी पकडून पोलीस त्यास गाडीत घेऊन जात असताना पोलीस म्हणत होते , तुज्या आईचा ...... तुज्या आईचा ..... आणि तुज्या आईचा.....जगाचे भले करताना आपल्या लेखणीची धार लावणाऱ्या पत्रकारास त्याच्या आईला दोन शब्दाचा सन्मान देता येऊ नये याचा एक पत्रकार म्हणून अतीव खेद वाटतो , सुमनताई माफ करा ,तुमचा लेक पत्रकार असल्यामुळे त्या पोलिसाने तुमची कूस काढली .
  कलेक्टर , एस पी , डॉक्टर , इंजीनियर जन्माला घालणाऱ्या माउली ला किती सन्मान आपण देतो नाही का , भरगच्च पगार , नौकर चाकर आणि रुबाब कमावणाऱ्या लेकाचा सर्वांना स्वाभिमान अभिमान असतो .
 मात्र आयुष्याचे भांडवल करून जीव धोक्यात घालून अन्यायाच्या विरोधातील आवाजाला आपल्या लेखणीतून बळ देणाऱ्या  पत्रकाराला जन्म देणाऱ्या मातोश्रीचा कुणी सन्मान करणार आहे का , ग्रामीण भागातील पत्रकार तर जाहिरातीतील कमिशन शोधून एक दमडी देखिल कमावत नाही त्याच्या आईने कुठले पाप केलेले असते म्हणून  तिचा लेक पत्रकार झाला . पत्रकार समाजाला बातम्या देतो , माहिती पुरवतो , पैसे तर कमावतच नाही वरून आईला कुठला सन्मान मिळवून देत नाही , उलट पोलीस त्यास त्याचे समाजउपयोगी काम करताना मारतात खूप मारतात आणि प्रत्येक फटक्यागणीक आई वर शिव्या देतात , त्या पत्रकाराच्या आईचा काय गुन्हा असतो म्हणून तिला शिव्या दिल्या जातात .
 शुटींग काढतो म्हणून मिलिंद चोपडेंना पोलिसांनी पकडले आणि फटके दिले वरून त्यांच्या आईवर म्हणजे सुमनबाई बन्शीलाल चोपडेवर शिव्या देण्याचा पोलिसांना कुणी परवाना दिला . एकप्रकारे तो स्त्रीच्या विनयाचा भंग नाही काय ? *समाज जागा ठेवण्यासाठी आपल्या लेखणीची छत्री तर अन्यायाचा बीमोड करताना लेखणीची समशेर करणारा पत्रकार , गरिबावर कुठला अन्याय झाला त्याच्यासाठी संघर्षाचा धागा बनणारा पत्रकार , महिलेवर अन्याय झाला तर तिचा भाऊ बणून तिची सुरक्षा करणारा  पत्रकार ,  कमी पगार घेऊन राबणारा जीव धोक्यात घालून भृष्टाचार बाहेर काढणारा पत्रकार , घरी लेकरे बायको एकटी झोपवून रात्रीच्या दोन वाजेपर्यंत डोळे फोडणारा पत्रकार , अन्यायी जुलमी शक्तीशी लढताना जीव धोक्यात घालणारा पत्रकार , भाड्याच्या घरात जीवन घालणारा पत्रकार , मुलीच्या लग्नाला उसने पैसे घेणारा अन आयुष्यभर फेडत बसणारा पत्रकार , आमच्या माई ने कुठले पाप केले होते म्हणून आम्ही तिच्या पोटाला जन्म घेतला
कारण आम्ही तिला मखमल देऊ शकत नाही , तीर्थयात्रा करवू शकत नाही किमान सन्मान तरी देऊ शकतो का ?

Comments

Popular posts from this blog

......पञकारीता सुरक्षित राहलेली नाही - जेष्ठ पञकार जोशी

देशात , महाराष्ट्रात पत्रकार क्षेत्र सुरक्षित राहिलेले नाही.पत्रकारांची नोकरीच धोक्यात आली आहे. एका झटक्यात त्यांना नोकरीवरून् काढले जात आहे.इतकी भयावह स्थिती या क्षेत्राची झाली आहे. देशातील  पत्रकारांचे व कर्मचारी वर्गांचे  वेतन निश्चित करण्यासाठी मजिठीया आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती.या  आयोगाचा  आपला सादर केला.पण याप्रमाणे वेतन देण्यास वृत्तपत्र मालकांनी संघटीतपणे  नकार दिला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने  या आयोगाने केलेल्या शिफारशी प्रमाणे वेतन देण्याचा निकाल दिला. तरी वृत्तपत्र मालक हे मान्य करावयास तयार नाहीत. इतकेच त्यांनी नव्हे कंत्राटी पत्रकार व संपादक  नियुक्त करण्याचा सपाटा लावला. पण याही पत्रकारांना मजिठीया आयोगा प्रमाणे वेतन देण्याचे निर्देश न्यायालयाने  दिले.  त्यामुळे तर  वृत्तपत्र मालक अधिक बिथरले आहेत .त्यांनी तर आता कामचुकार असल्याचा ठपका  तसेच नोटबंदीचा फटका  बहाणा करत पत्रकार कर्मचाऱ्यावर कुऱ्हाड  चालवत आहेत. अनेक जणांचा बदलीच्या  माध्यमातून छळ केला जात आहे.जेणे करून त्या पत...

कशी असावी पञकारीता ........

समाजातील राजकीय,प्रशासकीय  क्षेत्रातील लोकांनो श्रमजीवी,ग्रामीण पत्रकारिता काय असते हे तुम्हाला ज्ञात आहे का? कोण असतो पत्रकार? कशी असते पत्रकारिता? थोडे कान इकडे करा ऐका,       घरची भाकरी खाऊन जगाचा आरसा असतो पत्रकार??       घरदारावर तुळशीपत्र ठेवून,घरचे पैसे खर्चून,गावातील,परिसरातील प्रश्न त्याला तडीस नेण्यासाठी धडपडतो तो पत्रकार?    अहो तुम्हाला वाटेल पगार असेल अहो कसला पगार आम्हाला साधे मानधन ही नसते,असले तर अगदी थोडके,बातमीच्या शोध,लेखन,वेळ,व बातमी पाठविणे,ती छापून येईपर्यंत वाट बघणे,अन दुसर्या बातमीच्या शोधला लागणे ही पत्रकारिता असते, हे समजून घ्या,     कुठलाही आर्थिक आधार नसतांना बातमीला आपला श्वास समजतो पत्रकार,      बातमी आल्यावर तिचे परिणाम भोगतो पत्रकार?      लोकांच्या दूषणे,पुढारयांच्या नको त्या प्रश्नाला भिडतो पत्रकार, हे सर्व समाजासाठी भोगतो पत्रकार. हो हे लिहितो ना मी आहे तसाच, जो बातमीसाठी आयुष्य भर राबतोय,     समाजाला किती कळतो पत्रकार?????    अरे विच...

पञकारीता धंदा झाला??

आजच्या भारतीय लोकशाहीत विधी पालीका , न्यायपालीका व कार्यपालीका या तिन्ही स्तंभा शिवाय चौथा स्तंभ म्हणून पञकारीतेचा उल्लेख केला जातो . पञकारीतेला एवढे महत्वाचे स्थान देण्यात आले आहेकी समाजात घडत असलेल्या घडामोडीचे वास्तव्य समाजातील लोकांन समोर आणून त्यातील उणीव , उजागार करण्याचे महत्वपूर्ण कार्य महाराष्ट्रातील पञकारांनी करावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते .  याच लोकशाहीच्या माध्यमातून इंग्रजीकाळात   लोकमान्य टिळक , बाळ जांभेकर , पुथ्वीगीर गोसावि यांनी साप्ताहिक वृत्तपञाच्या माध्यमातून समाजाला आरसा बणविण्याचे महत्वपुर्ण काम केले .  मागील भुतकाळात वृत्तपञ चालकांनी वृत्तपञाच्या माध्यमातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले मात्र आजच्या धनदांडग्या युगात काही वृत्तपञ चालकांनी याच माध्यमातून त्या स्वातंत्र्यला सुराज्य करण्यासाठी याच साप्ताहिक , दैनिक व इलेक्ट्रानिक माध्यमाचा वापर केला नाही तर स्वातंत्र्याच्या स्वार्थासाठी राजकीय दलदल करून टाकला आहे.  आज पञकारीता परमोधर्म न राहता परमोधंदा बनला आहे. आज ग्रामीण पञकारांना थोड्या मानधनात वर्षागणपती वापरून त्यांना वेठबिगाराची व...