Skip to main content

स्वातंत्र्यदिनी जेष्ठ पञकारावर हल्ला .

पत्रकार हा समाजाचा आरसा असून लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, स्वातंत्र्यदिनी गिरणारे ता. जिल्हा नाशिक या गावात पत्रकारांना  होणारी अरेरावी ,  शिवीगाळ ,  अनादर ,  व त्यांच्यावरील ग्रामसभेत हल्ला हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली आहे .
या संपूर्ण ग्रामसभेच्या बैठीची सखोल चौकशीसाठी मा. मुख्यमंत्र्याना निवेदन पाठवून स्थानिक पोलीस प्रशासनाला कळविण्यात आले आहे . 
तसेच स्वातंत्र्य दिनी पत्रकारांवरील हल्ला  दुर्दैव नाही तर काय??
 स्वातंत्र्याचा दिवस ग्रामसभेचा गोंधळ बघून   " गावाकडे चला " म्हणणारर्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना ही अशी केंद्रित ग्रामव्यवस्था बघून दुःख होत असेल अशी भावना येथील जेष्ठ गावकर्यांनी व्यक्त केली.
   पत्रकारांवरील हल्ल्याची बातमी  मिळताच अखिल भारतीय पत्रकार समन्वय समिती , पत्रकार संरक्षण समिती ( महाराष्ट्र ) ,जर्नालिष्ठ एक्टीविझम फोरम , दिंडोरी प्रेस क्लब ,शेतकरी संघटनांची सुकाणू समिती , शेतकरी वाचवा अभियान , वारकरी महामंडळ , शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था ,मावळा प्रतिष्टान , आम आदमी पार्टी , प्रहार संघटना , दिव्यांग दुर्गसंवर्धन , गरुडझेप प्रतिष्टान , स्वाभिमानी शेतकरी संघटना , छत्रपती सेना , महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हातून पत्रकार संघटना व पत्रकार , समाजीक संघटना कृती समिती ,  यांनी या घटनेबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे . 
श्री  राम खुर्दळ व ज्ञानेश उगले या दोन्ही जेष्ठ पत्रकारांना पोलीस संरक्षण द्यावे .
हल्लेखोर हे खूनशी व राजकीय  असल्याने पत्रकारांच्या जीवाला व कुटुंबियांना धोका असल्याने याबाबत पोलीस विभागाने संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

Comments

sandip bhanose said…
हल्ल्याचा गरुडझेप प्रतिष्ठान जाहीर निषेद करते !

Popular posts from this blog

......पञकारीता सुरक्षित राहलेली नाही - जेष्ठ पञकार जोशी

देशात , महाराष्ट्रात पत्रकार क्षेत्र सुरक्षित राहिलेले नाही.पत्रकारांची नोकरीच धोक्यात आली आहे. एका झटक्यात त्यांना नोकरीवरून् काढले जात आहे.इतकी भयावह स्थिती या क्षेत्राची झाली आहे. देशातील  पत्रकारांचे व कर्मचारी वर्गांचे  वेतन निश्चित करण्यासाठी मजिठीया आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती.या  आयोगाचा  आपला सादर केला.पण याप्रमाणे वेतन देण्यास वृत्तपत्र मालकांनी संघटीतपणे  नकार दिला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने  या आयोगाने केलेल्या शिफारशी प्रमाणे वेतन देण्याचा निकाल दिला. तरी वृत्तपत्र मालक हे मान्य करावयास तयार नाहीत. इतकेच त्यांनी नव्हे कंत्राटी पत्रकार व संपादक  नियुक्त करण्याचा सपाटा लावला. पण याही पत्रकारांना मजिठीया आयोगा प्रमाणे वेतन देण्याचे निर्देश न्यायालयाने  दिले.  त्यामुळे तर  वृत्तपत्र मालक अधिक बिथरले आहेत .त्यांनी तर आता कामचुकार असल्याचा ठपका  तसेच नोटबंदीचा फटका  बहाणा करत पत्रकार कर्मचाऱ्यावर कुऱ्हाड  चालवत आहेत. अनेक जणांचा बदलीच्या  माध्यमातून छळ केला जात आहे.जेणे करून त्या पत...

कशी असावी पञकारीता ........

समाजातील राजकीय,प्रशासकीय  क्षेत्रातील लोकांनो श्रमजीवी,ग्रामीण पत्रकारिता काय असते हे तुम्हाला ज्ञात आहे का? कोण असतो पत्रकार? कशी असते पत्रकारिता? थोडे कान इकडे करा ऐका,       घरची भाकरी खाऊन जगाचा आरसा असतो पत्रकार??       घरदारावर तुळशीपत्र ठेवून,घरचे पैसे खर्चून,गावातील,परिसरातील प्रश्न त्याला तडीस नेण्यासाठी धडपडतो तो पत्रकार?    अहो तुम्हाला वाटेल पगार असेल अहो कसला पगार आम्हाला साधे मानधन ही नसते,असले तर अगदी थोडके,बातमीच्या शोध,लेखन,वेळ,व बातमी पाठविणे,ती छापून येईपर्यंत वाट बघणे,अन दुसर्या बातमीच्या शोधला लागणे ही पत्रकारिता असते, हे समजून घ्या,     कुठलाही आर्थिक आधार नसतांना बातमीला आपला श्वास समजतो पत्रकार,      बातमी आल्यावर तिचे परिणाम भोगतो पत्रकार?      लोकांच्या दूषणे,पुढारयांच्या नको त्या प्रश्नाला भिडतो पत्रकार, हे सर्व समाजासाठी भोगतो पत्रकार. हो हे लिहितो ना मी आहे तसाच, जो बातमीसाठी आयुष्य भर राबतोय,     समाजाला किती कळतो पत्रकार?????    अरे विच...

पञकारीता धंदा झाला??

आजच्या भारतीय लोकशाहीत विधी पालीका , न्यायपालीका व कार्यपालीका या तिन्ही स्तंभा शिवाय चौथा स्तंभ म्हणून पञकारीतेचा उल्लेख केला जातो . पञकारीतेला एवढे महत्वाचे स्थान देण्यात आले आहेकी समाजात घडत असलेल्या घडामोडीचे वास्तव्य समाजातील लोकांन समोर आणून त्यातील उणीव , उजागार करण्याचे महत्वपूर्ण कार्य महाराष्ट्रातील पञकारांनी करावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते .  याच लोकशाहीच्या माध्यमातून इंग्रजीकाळात   लोकमान्य टिळक , बाळ जांभेकर , पुथ्वीगीर गोसावि यांनी साप्ताहिक वृत्तपञाच्या माध्यमातून समाजाला आरसा बणविण्याचे महत्वपुर्ण काम केले .  मागील भुतकाळात वृत्तपञ चालकांनी वृत्तपञाच्या माध्यमातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले मात्र आजच्या धनदांडग्या युगात काही वृत्तपञ चालकांनी याच माध्यमातून त्या स्वातंत्र्यला सुराज्य करण्यासाठी याच साप्ताहिक , दैनिक व इलेक्ट्रानिक माध्यमाचा वापर केला नाही तर स्वातंत्र्याच्या स्वार्थासाठी राजकीय दलदल करून टाकला आहे.  आज पञकारीता परमोधर्म न राहता परमोधंदा बनला आहे. आज ग्रामीण पञकारांना थोड्या मानधनात वर्षागणपती वापरून त्यांना वेठबिगाराची व...