Skip to main content

गावातील पत्रकारांचे संरक्षण ही गावाची जबाबदारी.


अखिल भारतीय पत्रकार संरक्षण समिती,
प्रतिनिधी: - 
पत्रकार हा ग्रामविकासाचा मूळ दुवा आहे,ग्रामीण पत्रकार सध्यस्थितीत जास्त असुरक्षित आहे, कारण ते बातमी साठी समाजात, कार्यक्षेत्रात जावून बातमी मिळवतात,चित्रीकरण करतात,अत्यंत निस्वार्थी वृत्ती ,निरपेक्षपणे हे पत्रकार कार्यरत असतात,स्वखर्चातुन घरादारावर तुळशीपत्र ठेवून ही मंडळी वृतांकणासाठी जीवाचे रान करतात,अश्या पत्रकांराच्या माध्यमातून अनुभवातूनच ग्रामविकास होतो, हे स्थनिक ग्रामपंचायत प्रतिनिधी,आधीकारी,गावकरी,राजकीय,सामाजिक मंडळे ,संस्था यांनी जाणले पाहिजे,सातत्याने गावाच्या प्रश्नावर जागृती करणाऱ्या पत्रकारांवर राजकीय व गाव गुंडाकडून,दारूमाफिया,वाळू माफिया या कडुन जीवघेण्या दमदाटया,हल्ले होतात ही प्रकरणे अधिक वाढत आहेत,पत्रकार हा गावचा आरसा गावच्या विकासाचा केंद्र आहे,अश्या पत्रकारांवर गाव पातळीवर हल्ले होत असतील तर लोकांनी सत संत विवेकबुद्धी जागी ठेवून पत्रकारांना संरक्षण दिले पाहिजे ,वाईट प्रसंगात साथ दिली पाहिजे, मात्र केवळ वरवरची प्रयत्न होतात, हल्ला झाल्यास पत्रकार एकटे पडतात, हे दुर्दैव नाही तर काय आहे अहो गावासाठी झटणारे पत्रकार असुरक्षित असतील तर गावाचे भविष्य पारतंत्र्यात ठेवणार काय?ही लोकशाही नाही, गावाच्या पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणारे गाव खऱ्या अर्थाने जागृत गाव असते,अश्या निराधार असुरक्षित पत्रकारांचे संरक्षण गाव करीत नसेल तर आम्ही त्यासाठी सक्षम आहोत,आम्ही हल्लेखोरांशी प्रसंगी कायद्याने दोनहात करू,नाहीतर आमची शक्तीस्थाने आहेतच,  हेच धोरण सोबत घेऊन पत्रकार संरक्षण समिती ( महाराष्ट्र ) ,अखिल भारतीय पत्रकार समन्वय समिती,जर्नालिष्ठ एकटीविझम फोरम कार्य करणार आहे,असे एकमुखी ठराव करण्यात आले आहे,
      पत्रकारांवर हल्ल्याचे वाढते प्रमाण लक्ष्यात घेऊन गट तट सोडून पत्रकार संघटना एकत्रित येऊन, "मी पत्रकार" म्हणून संघटित होऊन पत्रकार हक्क अधिकारासाठी एकमुखी वज्रमुठ बांधावी,पत्रकारांच्या जीवावर उठलेल्या हल्लेखोरांना शिक्षा दंड व्हावा म्हणून पत्रकार संरक्षणाचा कायदा अस्तित्वात आला आहे, महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) विधेयक, २०१७’ असे या विधेयकाचे नाव आहे.

दोन्ही सभागृहांत हे विधेयक कोणत्याही चर्चेशिवाय एकमताने संमत करण्यात आले,विधेयकात प्रसारमाध्यमातील व्यक्तींवर हल्ले तसेच हिंसाचार करणाऱ्या व माध्यम संस्थांच्या मालमत्तेची हानी करणाऱ्या किंवा यापैकी काही करण्यास चिथावणी देणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांचा कारावास किंवा रुपये ५० हजाराचा दंड करण्याची तरतूद आहे प्रत्येक गावातील पत्रकारांचे संरक्षण ही त्या गावतील नागरिकांची,पोलिसांची,लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे हे विसरता कामा नये,
      प्रशांत कांबळे,दादाजी पगारे असो की राम खुर्दळ असे अनेक पत्रकार आयुष्यभर समाजात सातत्यांने पत्रकारिता करतात,सामाजिक जाणिवा ठेवून कार्यरत पत्रकारांवर जीवघेणे हल्ले,अपघात,खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, या प्रसंगात त्यांची साथ देण्यासाठी आता अखिल भारतीय पत्रकार समन्वय समिती,पत्रकार संरक्षण समिती ( महाराष्ट्र ) ,जर्नालिष्ठ एकटीविझम फोरम आता सक्षमपणे संघर्ष करणार आहे,असे या संघटनांचे प्रमुख सतीश रुपवते,
विनोद पत्रे, अनिल चौधरी , नंदकिशोर धोञे , योगेश कांबळे,दादाजी पगारे,मायाताई खोडवे,जेष्ठ पत्रकार कुमार कडलंग सर यांनी निर्धार केला आहे. 

Comments

Popular posts from this blog

......पञकारीता सुरक्षित राहलेली नाही - जेष्ठ पञकार जोशी

देशात , महाराष्ट्रात पत्रकार क्षेत्र सुरक्षित राहिलेले नाही.पत्रकारांची नोकरीच धोक्यात आली आहे. एका झटक्यात त्यांना नोकरीवरून् काढले जात आहे.इतकी भयावह स्थिती या क्षेत्राची झाली आहे. देशातील  पत्रकारांचे व कर्मचारी वर्गांचे  वेतन निश्चित करण्यासाठी मजिठीया आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती.या  आयोगाचा  आपला सादर केला.पण याप्रमाणे वेतन देण्यास वृत्तपत्र मालकांनी संघटीतपणे  नकार दिला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने  या आयोगाने केलेल्या शिफारशी प्रमाणे वेतन देण्याचा निकाल दिला. तरी वृत्तपत्र मालक हे मान्य करावयास तयार नाहीत. इतकेच त्यांनी नव्हे कंत्राटी पत्रकार व संपादक  नियुक्त करण्याचा सपाटा लावला. पण याही पत्रकारांना मजिठीया आयोगा प्रमाणे वेतन देण्याचे निर्देश न्यायालयाने  दिले.  त्यामुळे तर  वृत्तपत्र मालक अधिक बिथरले आहेत .त्यांनी तर आता कामचुकार असल्याचा ठपका  तसेच नोटबंदीचा फटका  बहाणा करत पत्रकार कर्मचाऱ्यावर कुऱ्हाड  चालवत आहेत. अनेक जणांचा बदलीच्या  माध्यमातून छळ केला जात आहे.जेणे करून त्या पत...

कशी असावी पञकारीता ........

समाजातील राजकीय,प्रशासकीय  क्षेत्रातील लोकांनो श्रमजीवी,ग्रामीण पत्रकारिता काय असते हे तुम्हाला ज्ञात आहे का? कोण असतो पत्रकार? कशी असते पत्रकारिता? थोडे कान इकडे करा ऐका,       घरची भाकरी खाऊन जगाचा आरसा असतो पत्रकार??       घरदारावर तुळशीपत्र ठेवून,घरचे पैसे खर्चून,गावातील,परिसरातील प्रश्न त्याला तडीस नेण्यासाठी धडपडतो तो पत्रकार?    अहो तुम्हाला वाटेल पगार असेल अहो कसला पगार आम्हाला साधे मानधन ही नसते,असले तर अगदी थोडके,बातमीच्या शोध,लेखन,वेळ,व बातमी पाठविणे,ती छापून येईपर्यंत वाट बघणे,अन दुसर्या बातमीच्या शोधला लागणे ही पत्रकारिता असते, हे समजून घ्या,     कुठलाही आर्थिक आधार नसतांना बातमीला आपला श्वास समजतो पत्रकार,      बातमी आल्यावर तिचे परिणाम भोगतो पत्रकार?      लोकांच्या दूषणे,पुढारयांच्या नको त्या प्रश्नाला भिडतो पत्रकार, हे सर्व समाजासाठी भोगतो पत्रकार. हो हे लिहितो ना मी आहे तसाच, जो बातमीसाठी आयुष्य भर राबतोय,     समाजाला किती कळतो पत्रकार?????    अरे विच...

पञकारीता धंदा झाला??

आजच्या भारतीय लोकशाहीत विधी पालीका , न्यायपालीका व कार्यपालीका या तिन्ही स्तंभा शिवाय चौथा स्तंभ म्हणून पञकारीतेचा उल्लेख केला जातो . पञकारीतेला एवढे महत्वाचे स्थान देण्यात आले आहेकी समाजात घडत असलेल्या घडामोडीचे वास्तव्य समाजातील लोकांन समोर आणून त्यातील उणीव , उजागार करण्याचे महत्वपूर्ण कार्य महाराष्ट्रातील पञकारांनी करावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते .  याच लोकशाहीच्या माध्यमातून इंग्रजीकाळात   लोकमान्य टिळक , बाळ जांभेकर , पुथ्वीगीर गोसावि यांनी साप्ताहिक वृत्तपञाच्या माध्यमातून समाजाला आरसा बणविण्याचे महत्वपुर्ण काम केले .  मागील भुतकाळात वृत्तपञ चालकांनी वृत्तपञाच्या माध्यमातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले मात्र आजच्या धनदांडग्या युगात काही वृत्तपञ चालकांनी याच माध्यमातून त्या स्वातंत्र्यला सुराज्य करण्यासाठी याच साप्ताहिक , दैनिक व इलेक्ट्रानिक माध्यमाचा वापर केला नाही तर स्वातंत्र्याच्या स्वार्थासाठी राजकीय दलदल करून टाकला आहे.  आज पञकारीता परमोधर्म न राहता परमोधंदा बनला आहे. आज ग्रामीण पञकारांना थोड्या मानधनात वर्षागणपती वापरून त्यांना वेठबिगाराची व...