सर्वप्रथम शिवसेना आमदार श्री राजेश क्षीरसागर यांना पञकार संरक्षण समितीच्या वतीने मानाचा मुजरा तथा स्नेही जय महाराष्ट्र !!
मुंबई - समाज व्यवस्थेचा चौथा खांब म्हणून पत्रकारितेला संबोधले जाते. दैनंदिन घडामोडी, विशेष बातम्या, माहिती, शासनाच्या योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम प्रसिद्धीमाध्यमांकडून केले जाते. त्याचमुळे समाजामध्ये पत्रकारांना विशेष असे स्थान प्राप्त झाले आहे. प्रसंगी ऊन, वारा, पाउस यांची तमा न बाळगता लोकांपर्यंत बातमीद्वारे सविस्तर माहिती पोहचविणाऱ्या पत्रकार बंधू भगीनिना इतर राज्यामध्ये निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात येतो, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ही सुविधा लागू नसल्याने पत्रकारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांनाही त्यांच्या हक्काची पेन्शन द्यावी, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये केली. या बाबी कडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधीमंडळात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला..यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, विविध राज्यात पत्रकारांना निवृत्ती वेतन दिले जाते. यामध्ये कर्नाटकमध्ये आठ हजार, गोवामध्ये दहा हजार, हरियाणामध्ये आठ हजार, केरळमध्ये दहा हजार अशी पेन्शन दिली जाते. उत्तर प्रदेश राज्यात पत्रकार वेलफेअर सोसायटीची स्थापना करून तेथील राज्य सरकारने पत्रकारांना खास निवृत्ती वेतनाचे नियोजन केले आहे. तामिळनाडूमधेही पेन्शन देण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात मात्र अशी कोणतीही योजना नाही आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी पत्रकारांना निवृत्ती वेतन देण्याचे जाहीर केले होते. मात्र, आजतागायत त्याची पूर्तता झाली नसल्याने पत्रकारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगत इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांनाही त्यांच्या हक्काची पेन्शन द्यावी, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली..*
ते पुढे म्हणाले कि, पत्रकारांना बातम्या गोळा करण्यासाठी ग्रामीण भाग व जिल्ह्यासह इतरत्र राज्यातही फिरावे लागते. त्यावेळी त्यांना अनेकवेळा टोल नाक्यावर टोल भरावा लागतो. सदर टोल नाक्यांवरही पत्रकारांना टोलमाफी देण्याबाबत शासनाने सत्वर निर्णय घ्यावा, अशी मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार राजेश क्षीरसागर यांनी संबधित मंत्रीमहोदयांकडे केली त्याबद्दल पञकार संरक्षण समिती , महाराष्ट्र तथा राज्यातील पञकारांच्या वतीने आपले धन्यवाद !!!
मुंबई - समाज व्यवस्थेचा चौथा खांब म्हणून पत्रकारितेला संबोधले जाते. दैनंदिन घडामोडी, विशेष बातम्या, माहिती, शासनाच्या योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम प्रसिद्धीमाध्यमांकडून केले जाते. त्याचमुळे समाजामध्ये पत्रकारांना विशेष असे स्थान प्राप्त झाले आहे. प्रसंगी ऊन, वारा, पाउस यांची तमा न बाळगता लोकांपर्यंत बातमीद्वारे सविस्तर माहिती पोहचविणाऱ्या पत्रकार बंधू भगीनिना इतर राज्यामध्ये निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात येतो, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ही सुविधा लागू नसल्याने पत्रकारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांनाही त्यांच्या हक्काची पेन्शन द्यावी, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये केली. या बाबी कडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधीमंडळात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला..यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, विविध राज्यात पत्रकारांना निवृत्ती वेतन दिले जाते. यामध्ये कर्नाटकमध्ये आठ हजार, गोवामध्ये दहा हजार, हरियाणामध्ये आठ हजार, केरळमध्ये दहा हजार अशी पेन्शन दिली जाते. उत्तर प्रदेश राज्यात पत्रकार वेलफेअर सोसायटीची स्थापना करून तेथील राज्य सरकारने पत्रकारांना खास निवृत्ती वेतनाचे नियोजन केले आहे. तामिळनाडूमधेही पेन्शन देण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात मात्र अशी कोणतीही योजना नाही आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी पत्रकारांना निवृत्ती वेतन देण्याचे जाहीर केले होते. मात्र, आजतागायत त्याची पूर्तता झाली नसल्याने पत्रकारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगत इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांनाही त्यांच्या हक्काची पेन्शन द्यावी, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली..*
ते पुढे म्हणाले कि, पत्रकारांना बातम्या गोळा करण्यासाठी ग्रामीण भाग व जिल्ह्यासह इतरत्र राज्यातही फिरावे लागते. त्यावेळी त्यांना अनेकवेळा टोल नाक्यावर टोल भरावा लागतो. सदर टोल नाक्यांवरही पत्रकारांना टोलमाफी देण्याबाबत शासनाने सत्वर निर्णय घ्यावा, अशी मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार राजेश क्षीरसागर यांनी संबधित मंत्रीमहोदयांकडे केली त्याबद्दल पञकार संरक्षण समिती , महाराष्ट्र तथा राज्यातील पञकारांच्या वतीने आपले धन्यवाद !!!
Comments