Skip to main content

खरंच बंद करा नौटकी निषेध आणि चमकोगीरीनौ??


कोणा पत्रकाराला ठार मारण्यात आले की त्या पुढील ७२ तास मिडियातल्या "चमको पत्रकारांना" निषेध व्यक्त करायची आयती संधी मिळते आणि त्या संधीचा हे "चमको पत्रकार" पुरेपुर वापर करून घेतात. कटू आहे पण हेच सत्य आहे. एरवी एखाद्या पत्रकाराला मारहाण झाली, त्याच्यावर अन्याय झाला की तो ज्या संस्थेत कार्यरत आहे ती वृत्तसंस्था सोडून तर इतर वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, वृत्तसंस्था त्याची जाणूनबूजून दखल घेत नाहीत. त्याबद्दल बातमी दाखवत नाहीत. राजकीय क्षेत्रापेक्षा बरबटलयं हे क्षेत्र.. वृत्तसंस्थाच्ये टीआरपी च्या खेळात सामान्य पत्रकारांची अक्षरशः ससेहोलपट होत आहे. कोणा राजकीय व्यक्तीवर हल्ला वगैरे झाला तर सर्व राजकारणी पक्षभेद विसरून एकत्र येतात.. एकीचे बळ त्यांना चांगलेच माहित आहे.परंतु जगाला शाळा शिकविणार्‍या पत्रकारांना हे कळूनही वळत नाही हेच दुर्दैव आहे. सामान्य बातमीदाराने एखादी महत्वाची बातमी पुराव्यानिशी पाठवली आणि नेमकं त्याच वेळी एखाद्या सेलिब्रेटीला साधी शिंक जरी आली की ती "BREAKING NEWS" होते आणि टीआरपीच्या हव्यासासाठी त्या बातमीदाराने जीवावर खेळून तयार केलेली "बातमी" सरळसरळ दाबली जाते. संबधित बातमीदार मात्र शत्रूत्व पत्करून बसतो. 

"जो बिकता है; वही दिखता है" अशी परिस्थिती मिडियाची आहे. एखाद्या होतकरू उमेदवाराच्या बातम्या दाबून त्याला निष्प्रभ करून त्याचे पत्रकारीता क्षेत्रातील मुल्य कमी करणे हा तर सेलिब्रेटी वरिष्ठ पत्रकारांचा आवडता खेळ बनला आहे. मिडिया लोकशाहीचा चौथा खांब आहे हे मोठ्या अभिमानाने मिडियावाले ओरडत असतात परंतु वास्तवात मिडियात इतकी हुकूमशाही आणि सरंजामदारी आहे की लोकशाहीचा येथे काही संबंधच नाही.

"सोशल मिडिया" प्रभावी ठरणार हे ओळखून अनेक नावाजलेल्या आणि खर्‍या पत्रकारांनी बाजारू मिडिया सोडून  ब्लाॅग, फेसबूक, वेबपेज, आदी माध्यमातून जातीवंत पत्रकारीता सुरू केली. अनेक पत्रकारांनी लाखो  वाचकांचा टप्पा ओलांडला तो केवळ सच्ची पत्रकारिता करून केलेल्या लिखाणामुळे.

आज "मिडिया हाऊस" म्हणजे  चलनी नाणे आहे हे ओळखून अनेकजण या माध्यमातून केवळ स्वतःचे उखळ पांढरे करून घेत आहेत. व्रतस्थ पत्रकारिता या प्रकाराशी त्यांचा काडीमात्र संबंध नाही. पूर्वी सुपारी देऊन गॅन्गस्टर च्या माध्यमातून प्रतिस्पर्ध्याला संपवले जायचे त्याच प्रमाणे हल्ली सुपारी घेऊन एखाद्याला आयुष्यातून उठविण्यासाठी अनेकदा मिडियाचा वापर होत आहे. इतकी खालावली गेली आहेत मिडिया हाऊसेस..

काही अपवादात्मक मिडिया वगळता बाकी सगळ्या ठिकाणी हिच स्थिती आहे. अनेक पत्रकारांचे उदरनिर्वाहाचे पत्रकारिता हे एकमेव साधन असल्यामुळे "सहन" करण्यापलिकडे त्यांच्या हातात काहीही नाही. याचा व्यवस्थित फायदा काही धेंडं करून घेत आहेत.

अनेकवर्ष रेंगाळलेला पत्रकार संरक्षण कायदा म्हणजे पत्रकारिता क्षेत्राचे नाकर्तेपण असे कोणालाच वाटत नाही. काही अपवाद सोडले तर इथे प्रत्येकाला सेलिब्रेटी बनायचय.. पण तेरड्याचे दिवस तीन अशी सेलिब्रेटिजची अवस्था आहे हे वास्तव स्विकारायला ते तयार नाहीत.

निरपेक्ष पत्रकारितेचा ठसा उमटविण्यास आपण कुठेतरी कमी पडतोय ही खंत न वाटणे म्हणजे पत्रकारितेचा बळी देण्यासारखेच आहे.

कोणा पत्रकाराचा खून झाला की अनेक रूदाल्या छात्या बडवून निव्वळ चमकोगीरी करतात. "प्रसिद्धी"  रूपी बिदागी मिळाली की पुढच्या खूनापर्यंत गप्प बसतात.. पुढचा खून झाला की पून्हा तमाशा सूरू...

फसव्या "BREAKING NEWS" च्या जमान्यात पत्रकार खरोखरचे "BREAK" होत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी खरोखरच काही करायची इच्छाच नसेल तर खरंच बंद करा हे नाटकी निषेध आणि चमकोगीरी.


या लेखाचे लेखक..

श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक

Comments

Popular posts from this blog

......पञकारीता सुरक्षित राहलेली नाही - जेष्ठ पञकार जोशी

देशात , महाराष्ट्रात पत्रकार क्षेत्र सुरक्षित राहिलेले नाही.पत्रकारांची नोकरीच धोक्यात आली आहे. एका झटक्यात त्यांना नोकरीवरून् काढले जात आहे.इतकी भयावह स्थिती या क्षेत्राची झाली आहे. देशातील  पत्रकारांचे व कर्मचारी वर्गांचे  वेतन निश्चित करण्यासाठी मजिठीया आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती.या  आयोगाचा  आपला सादर केला.पण याप्रमाणे वेतन देण्यास वृत्तपत्र मालकांनी संघटीतपणे  नकार दिला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने  या आयोगाने केलेल्या शिफारशी प्रमाणे वेतन देण्याचा निकाल दिला. तरी वृत्तपत्र मालक हे मान्य करावयास तयार नाहीत. इतकेच त्यांनी नव्हे कंत्राटी पत्रकार व संपादक  नियुक्त करण्याचा सपाटा लावला. पण याही पत्रकारांना मजिठीया आयोगा प्रमाणे वेतन देण्याचे निर्देश न्यायालयाने  दिले.  त्यामुळे तर  वृत्तपत्र मालक अधिक बिथरले आहेत .त्यांनी तर आता कामचुकार असल्याचा ठपका  तसेच नोटबंदीचा फटका  बहाणा करत पत्रकार कर्मचाऱ्यावर कुऱ्हाड  चालवत आहेत. अनेक जणांचा बदलीच्या  माध्यमातून छळ केला जात आहे.जेणे करून त्या पत...

कशी असावी पञकारीता ........

समाजातील राजकीय,प्रशासकीय  क्षेत्रातील लोकांनो श्रमजीवी,ग्रामीण पत्रकारिता काय असते हे तुम्हाला ज्ञात आहे का? कोण असतो पत्रकार? कशी असते पत्रकारिता? थोडे कान इकडे करा ऐका,       घरची भाकरी खाऊन जगाचा आरसा असतो पत्रकार??       घरदारावर तुळशीपत्र ठेवून,घरचे पैसे खर्चून,गावातील,परिसरातील प्रश्न त्याला तडीस नेण्यासाठी धडपडतो तो पत्रकार?    अहो तुम्हाला वाटेल पगार असेल अहो कसला पगार आम्हाला साधे मानधन ही नसते,असले तर अगदी थोडके,बातमीच्या शोध,लेखन,वेळ,व बातमी पाठविणे,ती छापून येईपर्यंत वाट बघणे,अन दुसर्या बातमीच्या शोधला लागणे ही पत्रकारिता असते, हे समजून घ्या,     कुठलाही आर्थिक आधार नसतांना बातमीला आपला श्वास समजतो पत्रकार,      बातमी आल्यावर तिचे परिणाम भोगतो पत्रकार?      लोकांच्या दूषणे,पुढारयांच्या नको त्या प्रश्नाला भिडतो पत्रकार, हे सर्व समाजासाठी भोगतो पत्रकार. हो हे लिहितो ना मी आहे तसाच, जो बातमीसाठी आयुष्य भर राबतोय,     समाजाला किती कळतो पत्रकार?????    अरे विच...

पञकारीता धंदा झाला??

आजच्या भारतीय लोकशाहीत विधी पालीका , न्यायपालीका व कार्यपालीका या तिन्ही स्तंभा शिवाय चौथा स्तंभ म्हणून पञकारीतेचा उल्लेख केला जातो . पञकारीतेला एवढे महत्वाचे स्थान देण्यात आले आहेकी समाजात घडत असलेल्या घडामोडीचे वास्तव्य समाजातील लोकांन समोर आणून त्यातील उणीव , उजागार करण्याचे महत्वपूर्ण कार्य महाराष्ट्रातील पञकारांनी करावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते .  याच लोकशाहीच्या माध्यमातून इंग्रजीकाळात   लोकमान्य टिळक , बाळ जांभेकर , पुथ्वीगीर गोसावि यांनी साप्ताहिक वृत्तपञाच्या माध्यमातून समाजाला आरसा बणविण्याचे महत्वपुर्ण काम केले .  मागील भुतकाळात वृत्तपञ चालकांनी वृत्तपञाच्या माध्यमातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले मात्र आजच्या धनदांडग्या युगात काही वृत्तपञ चालकांनी याच माध्यमातून त्या स्वातंत्र्यला सुराज्य करण्यासाठी याच साप्ताहिक , दैनिक व इलेक्ट्रानिक माध्यमाचा वापर केला नाही तर स्वातंत्र्याच्या स्वार्थासाठी राजकीय दलदल करून टाकला आहे.  आज पञकारीता परमोधर्म न राहता परमोधंदा बनला आहे. आज ग्रामीण पञकारांना थोड्या मानधनात वर्षागणपती वापरून त्यांना वेठबिगाराची व...